रत्नागिरी:- तालुक्यातील बसणी नागझर स्टॉप येेथे बेदरकारपणे एसटी चालवून समोरुन येणार्या एसटीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना शनिवार 11 जून रोजी सकाळी 10.30 वा.घडली. जितेंद्र रमेश कदम (रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित एसटी चालकाचे नाव आहे.
तर या अपघातात हेतवी गुरव (रा.लांजा, रत्नागिरी), पुष्पा कारंडे (रा.ठाणे) आणि उत्कर्षा वाडेकर (रा.ऐरोली, नवी मुंबई) हे तीन प्रवाशी जखमी झाले आहेत.या बाबत बालाजी नागुराव कोळी (43,मुळ रा.देवराली कळंब, जि.उस्मानाबाद सध्या रा.रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार, शनिवारी सकाळी बालाजी कोळी आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-20- बीएल-1660) घेउन रत्नागिरी ते गणपतीपुळे असे जात होते.त्याच सुमारास जितेंद्र कदम आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-20- बीएल-1171) घेउन वरवडे, नेवरे ते रत्नागिरी असा भरधाव वेगाने येत होता.या दोन्ही एसटी बसणी नागझरी स्टॉपजवळ आल्या असता जितेंद्रचा एसटीवरील ताबा सूटला आणि त्याने समोरुन येणार्या एसटीला धडक देत अपघात केला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.