जिल्ह्यात 24 तासात तब्बल 513 कोरोना बाधित; रुग्णसंख्या 18 हजार पार

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येत गेल्या 24 तासात लक्षणीय वाढ झाली आहे. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 513 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 513 पैकी 169 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 344 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 513 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 18 हजार पार झाली आहे.

मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 513 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 18 हजार 046 वर जाऊन पोहचली आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 169 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 344 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात 675 अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,18,834 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाने तब्बल 26 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 529 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.96 % आहे. आज जिल्ह्यात 77 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 71.05 टक्के आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 513 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 165, दापोली 51, खेड 29, गुहागर 65, चिपळूण 108, संगमेश्वर 68, मंडणगड 12 आणि राजापूर 15 तालुक्यात रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 13.18% आहे.