जिल्ह्यात 24 तासात 582 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 582 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी याच काळात सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात पाचशेवर रुग्णसंख्येची नोंद झाल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. 582 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 39 हजार 633 झाली आहे.

मागील 24 तासात तब्बल 10 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या मृत्यूपैकी सर्वाधिक 4 रत्नागिरी तालुक्यातील तर राजापूर 3, चिपळूण 2 आणि संगमेश्वर तालुक्यात एका मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 330 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 388 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 262, खेड 132, गुहागर 95, दापोली 116, संगमेश्वर 161, लांजा 68, राजापूर 96 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.35% आहे.

जिल्ह्यात गेल्या शनिवारी 494, रविवारी 508 तर सोमवारी 395, मंगळवारी 655, बुधवारी 610, गुरुवारी 389 तर शुक्रवारी 590 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1416 पैकी 374 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 974 पैकी 208 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.