जिल्ह्यात 24 तासात 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 114 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात उपचारा दरम्यान दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 342 बळी घेतले आहेत.

मागील 24 तासात नव्याने 12 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 433 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 114 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 64 हजार 497 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 16 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 985 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 342 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 95.25 टक्के आहे.