आतापर्यंत 10 बळी, रत्नगिरीतही आठ मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे आजपर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू हे दापोली तालुक्यात झाले असून, दापोलीत कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात कोरोनाने आठ बळी घेतले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊन कालावधी पासून तर वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या तेराशेच्या पुढे पोचली आहे.
दरम्यान कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय असताना मागील काही काळावधीपासून कोरोनाने मृत रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यात 42 जण दगावले आहेत. काहींचा मृत्यू हा उपचारादरम्यान झाला आहे, तर काहीजण उपचारापूर्वीच दगावले, ज्यांचे अहवाल नंतर पॉझिटिव्ह आले. दरम्यान पैकी एकट्या दापोली तालुक्यात 10 जणांचा कोरोनामुळे झाला आहे. त्याखालोखाल चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात मृतांची संख्या आहे, या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर संगमेश्वर तालुक्यात 6 जण कोरोनामुळे दगावले. तर खेड तालुक्यात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राजापूर आणि गुहागरमध्ये प्रत्येकी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर लांजा आणि मंडणगडमध्ये एक एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.