भीक मागण्यासाठी मुंबईतून गोव्याला निघालेली ५ मुले पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी:- मुंबईतून भीक मागण्यासाठी गोव्याला निघालेली ५ अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास पडताच त्यांनी त्या सर्व मुलांना रत्नागिरी येथील चाईल्ड लाईन व महिला व बालकल्याण विभागाकडे सुपूर्द केले . त्यामुळे या मुलांना आपले पालक मिळण्यास मदत होणार आहे.

मुंबई येथून ५ अल्पवयीन मुले रेल्वेने गोव्यामध्ये जात होती . यामध्ये मानखुर्द येथील ३ तर सुरत आणि गुजरात येथील प्रत्येकी एका मुलाचा समावेश होता . मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने या सर्वांना हेरले . रत्नागिरीमध्ये या सर्वांना चाईल्ड लाईनच्या माध्यमातून संबंधितांकडे सुपुर्द करण्यात आले . रत्नागिरी जिल्हाधिकारी एम . देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंस्था , चाईल्ड लाईन तसेच महिला व बालविकास अधिकारी हे याकामी काम करत आहेत.