मिरजोळे येथील अपघात प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील उतारात दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ मे रोजी रात्री १२.३० वा. घडली. जाहीद अल्ली अब्दुल रहीम धामस्कर (४९, रा. मजगाव, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री जाहिद धामस्कर स्वतःच्या ताब्यातील दुचाकी (एमएच – ०८ – वाय -४७६७ ) वरुन पत्नी रोजीना धामस्कर यांचेसोबत रत्नागिरी ते करबुडे रोडने प्रवास करत असताना मिरजोळे पाटीलवाडी येथील उतारात दुचाकीचा अचाकनपणे ब्रेक लावल्याने दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. यात पती – पत्नी दोघही जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी खासगी – रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.