युवा उद्योजक निराश! बँकांकडून केवळ दहा टक्के कर्ज प्रस्ताव मंजूर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोेजगार निर्मितीस चालना मिळावी, अनेक तरुण, तरुणींनी स्वत:चा व्यवसाय करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या हेतून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची अंमलबजावणी केली या योजनेमुळे 2 हजार 229 लोकांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अर्ज भरुन बँकेकडे कर्जासाठी सादर केले. मात्र, हजारों प्रकरणातून केवळ 272 प्रकरणे मार्गी लागली. प्रशासनाकडून अंमलबजावणी ठोसपणे होत असताना बँका मात्र कर्ज देताना अनेक त्रुटी दाखवून या योजनेचे अर्ज नामंजूर केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही रोजगार निर्मिती योजना रत्नागिरी जिल्ह्यात लागू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे झाले पाहिजे, यासाठी मंत्री सामंत यांनी वारंवार पाठपुरावाही केला मात्र त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राकडून 2 हजार 229 अर्ज बँकांकडे सादर झाल्याची माहिती समोर आली. यातील 1452 प्रकरणे नामंजूर करुन केवळ 272 प्रकरणांना बँकांनी कर्ज मंजूर केले आहे. धक्कादायक म्हणजे इतर काही जिल्ह्यामध्ये बँकांकडून चांगला प्रतिसाद लाभार्थींना दिला जात असल्याची माहिती समोर आर्लीी. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातच काही बँकांकडून या योजनाा यशस्वी करण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. कागदपत्रे अपूर्ण, योजनेत बसत नाही असे नानाविध कारणे पुढे करत प्रकरणे नामंजूर केली जात आहे.