कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात; तीन दिवसात केवळ पाच रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवसात केवळ 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 499 तपासण्यांमध्ये केवळ 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 7 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.

जिल्ह्यात 24 तासात 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 882 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.97 टक्के आहे. नव्याने 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 438  झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 13 तर संस्थात्मक विलगीकरणात 7 रुग्ण उपचार घेत आहेत.