रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 769 तापसण्यांमध्ये केवळ 42 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 71 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 80 हजार 939 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.18 टक्के आहे. नव्याने 42 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 154 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 522 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 382 तर संस्थात्मक विलगीकरणात 222 रुग्ण उपचार घेत आहेत.