मुरुगवाडा येथे विहिरीच्या पाण्यात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील अल्पवयीन मुलगा विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत सापडला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आसिफ लतीफ शेख (वय १३,रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडे अकराच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा खेळत असताना विहिरीच्या पाण्यात पडला. नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेतला तो विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सापडला. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.