साळवी स्टॉप येथील दहावी – बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रविवार ७ मे रोजी गौरव समारंभ पार पडला. नगर परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती शिल्पा सुर्वे यांच्या संकलावनतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साळवी स्टॉप येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात साळवी स्टॉप परिसरातील तब्बल ६० विद्यार्थांना गौरवण्यात आले. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल यशासाठी नेहमीच धडपडत रहावे असे मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी देखील कठोर परिश्रम घेत यशीची शिखरे अशीच सर करत रहावीत असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी थरवळ यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवल, खजिनदार शरद रेडिज, कार्यकारिणी सदस्य भालचंद्र बापट, कार्यवाह सुरेश पावसकर, मोहन लिमये, माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, प्रिया साळवी, मानसी साळुंखे, सीमा कदम, वैदाही पावसकर, नरेंद्र देसाई, उद्योजक सौरभ मलुष्टे, प्रशांत सुर्वे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी मानले.