राजापूरात पुरात अडकलेल्या ५६ नागरिकांची सुटका

राजापूर:- राजापूर तालुक्यात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. राजापूर बाजारपेठेमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये ५६ नागरिक अडकले होते. बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यात आले आहे.काल राजापूर बाजारपेठेत पाच ते सहा फुटांपर्यंत पुराचं पाणी साचले होते.

राजापूरात पुरात अडकलेल्या ५६ नागरिकांना राजापूर पोलिसांनी रेस्क्यु ऑपरेशनच्या सहाय्याने वाचवले आहे. जवळपास पाच ते सहा तास रेस्क्यु ऑपरेशन सुरु होतं. राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात नागरिक अडकले होते. बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरीकांना काढले बाहेर काढण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांची नेतृत्वाखाली मोलाची कामगिरी करण्यात आली आहे.