खानू येथे दोन दुचाकींच्या अपघातात महिला ठार

पाली:- मुंबई गोवा महामार्गावर पाली नजीकच्या खानू येथे पेट्रोलपंपाच्या समोर दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात एक महिला ठार झाली. तर दोघे जण जखमी झाले. अरुणा सिताराम कोलगे (रा. येरवंडे ता. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात दोन्ही दुचाचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ती पाली पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सुरळीत केली.

पाली पोलिस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर पाली नजीकच्या खानू गावच्या हद्दीत खानू पेट्रोलपंपासमोर काल (ता. १४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गौरव काशिनाथ कडू हा दुचाकीने वडील काशिनाथ भिवा कडू यांना घेऊन पालीहून मठाच्या दिशेने जात होता. पेट्रोल पंपाच्यासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूने येणारी दुचाकी पेट्रोल पंपात जात असताना उजव्या बाजूने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. यामध्ये दुसऱ्या दुचाकी वरील अरुणा सीताराम कोलगे ( रा. येरवंडे ता. लांजा) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ पाली ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात गौरव काशीनाथ कडू, काशिनाथ भीवा कडू (दोघेही रा. मठ कडूगाव, सिताराम यशवंत कोलगे रा. येरवंडे) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती सिताराम कोलगे (रा. येरवंडे) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस द्रक्षेत्र येथे दिल्यावरून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.