हर्चे पनोरचीवाडी येथील विवाहिता बेपत्ता

लांजा:- तालुक्यातील हर्चे पनोरचीवाडी येथील विवाहित महिला गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता झाली असून ती घरातून निघताना कोणाला काहीच न सांगता निघून गेली, मात्र घरात न परतल्याने तिच्या पतीने लांजा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुशाली राजेंद्र तरळ (४५, हर्चे, ता. लांजा, जि.रत्नागिरी) ही शनिवार २५ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बॅग भरून कोणाला काहीच न सांगता निघून गेली. ती घरी परत न आल्याने राजेंद्र पांडुरंग तरळ यांनी आजूबाजूतील परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली, सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर त्यांनी २९ मे रोजी सायं. ४.२०च्या सुमारास लांजा पोलीस स्थानकात आपली झाल्याची दाखल केली. बेपत्ता तक्रार रुशाली हिची उंची ४ फुट, रंग सावळा, अंगाने मध्यम, केस काळे व लांब, चेहरा उभट, कानात झुमके, नाकात फुली, गळ्यात एकसर मंगळसुत्र, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, पायात पैंजन व सॅण्डल, लाल रंगाची फुले असलेली साडी व ब्लाउज असून तिचे जवळ इंटेक्स कंपनीचा साधा मोबाईल असून सदर व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस स्थानकात संपर्क साधावा.