आठवडा बाजारातील भंगार गोडावूनला आग

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील भंगार गोडाऊनला सायंकाळी आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून गेल्याने भंगार व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे बांब घटनास्थळी बंब दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेले ही भंगार गोडाऊने भविष्यात मोठी दुर्घटनेची कारण ठरु शकतात. नागरी वस्तीसह जवळच बसस्थानक आहे. परिसरात इतर खाजगी वाहनेही उभी करुन ठेवली जातात अशा ठिकाणी असलेली गोडाऊन शहरासाठी धोकादायक असताना प्रशासनाने त्यांना इथे गोडाऊनची परवांनगीच कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.