चांदसुर्या येथे दुचाकी घसरून दुचाकीस्वार ठार

रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी असा प्रवास करणाऱ्या स्वाराचा चांदसुर्या रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला. या अपघातात स्वाराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

रुपेश अरविंद साळवी (वय ५२, रा. मातृछाया- संभाजीनगर, नाचणे, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २९) दुपारी साडेबाराच्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरी रस्त्यावर चांदसुर्या येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुपेश साळवी दुचाकी (क्र. एमएच-०८ एड्ब्ल्यू ५४६९) घेऊन हातखंबा ते रत्नागिरीकडे येत होते. चांदसुर्या रस्त्यावर त्यांची दुचाकी स्लिप झाली. दुचाकीवरिल ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघाताचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आला आहे. या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.