चांदोर येथील प्रौढाचा पाण्यात पडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर-गोताडवाडी येथील पाण्याच्या डोहात पडून प्रौढाचा मृत्यू झाला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवाकर शंकर कालकर (वय ४८, रा. चांदोर गोताडवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे.

ही घटना रविवारी (ता. २९) सकाळी अकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाकर कालकर यांना मद्याचे व्यसन होते. तसेच त्यांना नदीतील मासे पकडण्याचा छंद होता. रविवारी ते मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरुन पाण्याच्या डोहात पडून गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिवाकर यांचा भाऊ याने पुर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.