गांजाप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी नं . ३ येथे २५ हजार रुपयांचा गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या ५ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवार दि . २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली . बीरबहाद्दूर केदुराम चौधरी , विकास मंटू चौधरी , निखिल विष्णू ठारु , शंकर क्रिष्णा चौधरी , राजकुमार आसाराम दंगावरा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ५ संशयितांची नावे आहेत . शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांनी मिरकरवाडा जेटी नं . ३ येथे धाड टाकली असता त्यांना त्या ठिकाणी संशयित हे त्यांच्या ताब्यात ७८५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून असताना आढळून आले . त्यांच्याकडे रोख ६ हजार १६० रुपये आणि २१ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ५१ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.