प्राथमिक शिक्षक समितीमार्फत पालकमंत्र्यांचे आभार

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला दिलेल्या आमसभेतील शब्दाप्रमाणे जिल्हानंतर्गत बदली टप्पा सहा मधील सर्व १६९ शिक्षकांचे समुपदेशन करून सदर प्रश्न मार्गस्थ लावल्याबद्दल व अन्यायग्रस्त शिक्षकांनी न्याय मिळवून दिल्याबद्दल पालकमंत्री ना. उदय सामंत याचे समितीच्यावतीने आभार मानण्यात आले.

जि.प. शिक्षकांच्या सन २०१९ मध्ये झालेल्या विस्थापित रँडम बदल्यांबाबत अशाच प्रकारे समुपदेशन तत्परतेने करून शिक्षकांना न्याय मिUवून द्यावा.जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदे भरती त्वरित करण्यात यावी.याबाबत संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.