रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी 10.30 वाजेपर्यंत 19.40 टक्के मतदान

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदारांचा मतदानाला थंड प्रतिसाद दिसून आला. सकाळी 10.30 पर्यंत 19.40% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे सेना विरुद्ध बाळासाहेबांची सेना आणि भाजप युतीचा सामना रंगला आहे.