रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथे गुरुवारी रात्री घराशेजारी उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी केतन जयवंत मयेकर (३५, मुरुगवाडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
केतन मयेकर यांनी घराशेजारी दुचाकी लावली होती. मात्र गुरुवार 15 डिसेंबर रोजी रात्री 10 सुमारास दुचाकीला आग लागली. दुचाकीला आग लागल्याचे समजताच शेजाऱ्यांच्या मदतीने मयेकर यांनी आग आटोक्यात आणली.