‘गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात बाप्पांना निरोप

दोन वर्षांनी विसर्जन मिरवणूकी भक्त तल्लीन

रत्नागिरी:- कोरोना प्रादुर्भावानंतर तब्बल दोन वर्षांनी भव्य मिरवणूका काढून ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया!पुढच्या वर्षी लवकर यांच्या घोषणा देत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. रत्नागिरीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्त्यांचे विसर्जन होणार असल्याने शहरातील मांडवीसह जिल्ह्यातील प्रमुख्य विसर्जनस्थळावर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला  होता.
 

सोमवारी जिल्ह्यात पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला.यावेळी भक्तांचा जोश पहायला मिळाला. दोन वर्ष मिरवणूका न काढता गणेश विसर्जन झाले होते. त्यामुळे या वर्षीच्या विसर्जन मिरवणूका काहीशा वेगळ्याच होत्या.  यामध्ये १४ सार्वजनिक आणि १ लाख १४ हजार ९६५ गणरायांना निरोप देण्यात आला. यापैकी रत्नाागिरी शहरामधील ५ हजार ५३१ घरगुती तर ४ सार्वजनिक गणेशेमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आले. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात ७ हजार ९९४ घरगुती गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. जयगड परिसरात १ हजार ७१७ घरगुती आणि १ सार्वजनिक संगमेश्वर ९ हजार १७७ घरगुती, राजापूर १०,६७४ घरगुती, नाटे ५ हजार ६३२ घरगुती, लांजा ११ हजार ७७०घरगुती, देवरूख ८ हजार १७०, सावर्डे ९ हजार ३२२ घरगुती, चिपळूण ९ हजार ७७५ घरगुती आणि ३ सार्वजनिक, गुहागर ९ हजार २००घरगुती, अलोरे ५ हजार ३००घरगुती, खेड १०हजार ६०२ घरगुती तर ३ सार्वजनिक, दापोली २ हजार ५०० घरगुती तर १ सार्वजनिक, मंडणगड ३ हजार ५६ घरगुती तर १ सार्वजनिक, बाणकोटमध्ये ३९५ घरगुती तर २ सार्वजनिक, पूर्णगडमध्ये ३ हजार ३५१ खासगी आणि दाभोळमध्ये १ हजार २७९ खासगी गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.