ट्रकला आराम बसची मागून धडक, चालक जागीच ठार

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील वाटूळ येथे रविवारी रात्री 8.30 वा. च्या सुमारास तांबळवाडी फाटा आराम बस आणि बसचा अपघात झाला. रस्त्यावर गुरे आडवी आल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला. याचवेळी मागून येणाऱ्या आरामबसने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा मोठा होता की, आराम बसचे चालक राजेंद्र गावडे (35, रा.असरोंडी, ता.कणकवली) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गावडे हे कणकवलीहून  खाजगी आरामबस घेऊन मुंबईला जात होते. याचवेळी लांजाकडे चिऱ्याचा ट्रकही  चालला होता. दरम्यान आरामबसच्या पुढे चालणाऱ्या ट्रकने वाटूळ येथे अचानक जनावरे जनावरे आडवी आल्यामुळे ब्रेक लावला. पाठीमागून येणारी आरामबस थांबलेल्या या ट्रकवर जोरदार आदळली. याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात अपघातांची नोंद करण्यात आली आहे.