राज्यात एसटीच्या 1 हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतर

रत्नागिरी विभागाकडून 200 सीएनजी; 125-200 इलेक्ट्रीक बसेसची महामंडळाकडे मागणी

रत्नागिरी:-कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडला आहे. महामंडळावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील 1 हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने रत्नागिरीतही हालचाली सुरु झाल्या असून एसटीच्या विभागीय कार्यालयाशेजारीच सीएनजी गॅस पंपाच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. तर सीएनजीमध्ये रुपांतरीत झालेल्या 200 बसेसची मागणी रत्नागिरी विभागाने केली आहे. तर त्याच्या सोबतच सुमारे 125 ते 200 इलेक्ट्रीक बसेसची मागणी महामंडळाकडे करण्यात आली आहे.

कोरोना संकटामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली तर कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटीची वाहातुक पुर्णत: ठप्प झाली होती. त्याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. अशातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. एसटी महामंडणाच्या तापमयात डिझेलवर धावणार्या 17 हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या 34 टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किंमतीमुणे तो आता 38 ते 40टक्यांवर पोहोचला आहे. डिझेलवर होणार्‍या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणार्‍या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे. इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी सीएनजीबरोबरच इतर पर्यायांचाही वापर करण्यात येणार आहे. वातावरणीय बदलामुळे बिघडलेले निसर्गचक्र अबाधित ठेवण्यासाठी तसेच डिझेलच्या वाढत्या किंमती , प्रवाशांना प्रदुषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी एसटी महामंडळाने पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय निवडला आहे . त्यासाठी सध्या डिझेलवर धावणार्‍या 1 हजार गाड्यांचे सीएनजी या पर्यायी इंधनामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या रिट्रोफिटमेंटसाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला निधी देणार आहे.
रत्नागिरी विभागात पहिल्या टप्प्यात 200 गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. एसटी बँकेच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत सीएनजी गॅस पंपाची उभारणी सुरु झाली आहे. पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून  येत्या सहा महिन्यात गॅस पंपाची उभारणी पूर्ण होणार आहे. त्याच कालावधीत सीएनजीवर रुपांतरीत झालेल्या बसेस रत्नागिरीत दाखल होणार आहेत.

इंधनाचा पर्यायी वापर करताना केवण सीएनजीवर अंवलंबून न रहाता इलेक्ट्रीक बसेसचा ही वापर केला जणार आहे. रत्नागिरी विभागाने 125 ते 200 गाड्यांची मागणी  पहिल्या टप्प्यात केली आहे.
इंधनावरील खर्च कमी करण्यासोबतच प्रदुषणमुक्त गाड्या वापरावा भर देण्याचा निर्णय महामंडणाने घेतला आहे. त्याअंतर्गत रत्नागिरी विभागात सीएनजी व इलेक्ट्रीक गाड्या लवकरच एसटी विभागाच्या तापमयात दाखल होती. त्यादृष्टीने आवश्यक तयारी, सीएनजी पंपाच्या उभारणीचे काम वेगाने सुरु आहे, असे श्री.प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.