निवळी-जयगड मार्गावर कार- ट्रकची समोरासमोर धडक

रत्नागिरी:- रत्नागिरीतील निवळी-जयगड रस्त्यावर कारचा भीषण अपघात झाला. कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारच प्रचंड मोठं नुकसान झाले आहे.

या अपघातात कारच्या छतासह दर्शनी भागाला मोठा फटका बसला. तर ट्रकचंही नुकसान झाले आहे. या अपघातानंतर दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रत्नागिरी-जयगड-निवळी मार्गावरील निवळी इथे हा घडलेल्या या अपघाताच्या घडनेनंतर एकच खळबळ उडाली होती.

 मोठा अनर्थ या अपघातात टळलाय. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तीन अपघात नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे अपघातांची मालिकाच संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतेय. नेमका निवळी इथं झालेला अपघातत कोणत्या कारणामुळे झाला, हे कळू शकलं नाही. मात्र भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, अशी शंका उपस्थित केली जातेय.