झोपेत बोटीवरून समुद्रात पडल्याने खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील साखरतर येथे झोपेत बोटीवरून समुद्राच्या पाण्यात पडल्याने खलाशी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 9 ते शनिवार 2 एप्रिल रोजी स.9 वा. दरम्यान घडली.

विलास रुपाजी मास्कर (32,रा.मासू गुहागर, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या खालाशाचे नाव आहे. याबाबत सचिन तुकाराम पोमेंडकर (58,रा.कासारवेली, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली.त्यानुसार,शुक्रवारी रात्री 9 वा.नेहमीप्रमाणे विलास मास्कर हा सचिन पोमेंडकर यांच्या घरी जेऊन साखरतर येथे बोटीवर झोपण्यासाठी गेला होता.शनिवारी सकाळी 5 वा.पोमेंडकर मच्छिमारीसाठी बोटीवर गेले असता त्यांना विलास बोटीवर दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला समुद्राच्या पाण्यात त्याचा शोध घेतला असता त्यांना दुसऱ्या एका बोटीजवळ पाण्यात तळाशी विलास दिसून आला.पोमेंडकर यांनी इतर खलाशांच्या मदतीने विलासला बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विलासला तपासून मृत घोषित केले.