जिल्ह्यात कोरोनाचा पारा शून्यावर

रत्नागिरी:-जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही तर जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सलग दुसर्‍या दिवशी शून्यावर आली आहे. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. 

ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सलग दुसर्‍या दिवशी शून्यावर आल्याने आज कोरोनामुक्त रुग्णसंख्या शुन्यावर आली आहे. आत्तापर्यंत 81 हजार 932 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  97 टक्के आहे. नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 466 इतकी स्थिर आहे. जिल्ह्यात कोरोनाने  आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे.