रत्नागिरी:- सातत्याने वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येतुन रविवारी दिलासा मिळाला. रविवारी आलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्ये मोठी घट झाली. जिल्ह्यात 24 तासात 155 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मृत्यूसंख्या देखील शून्य आहे.
जिल्ह्यात 24 तासात 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 78 हजार 975 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.43 टक्के आहे. नव्याने 155 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 82 हजार 756 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 501 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.2 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 884 तर संस्थात्मक विलगीकरणात 301 रुग्ण उपचार घेत आहेत.