भगवती किल्ल्यावरील वेताळ बुरुजावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:-शहरातील भगवती किल्ल्यावरील वेताळ बुरुजवरून तरुणाने उडी मारत पेठकिल्ला येथील तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. 

अमोल उर्फ मुन्ना कृष्णा चव्हाण (33 रा. पेठकील्ला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मानसिक रुग्ण होता. शनिवारी सायंकाळी भगवती किल्ल्यावर गेलेल्या काही पर्यटकांना तेथील बुरुजाखालील खोल दरीत एक मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.