रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 380 अहवालांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. तसेच 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 32 रुग्ण उपचारखाली आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 3 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 580 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.81 टक्के आहे. एकुण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 101 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 489 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.15 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 17 तर संस्थात्मक विलगीकरणात 15 रुग्ण उपचार घेत आहेत.