ओमिक्रॉनच्या धोक्यातही जिल्ह्यात केवळ 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- ओमिक्रॉन विषाणूचा धोका असताना जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण नगण्यच आहे. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 599 अहवालांमध्ये केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 51 रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 4 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 559 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.79 टक्के आहे. नव्याने 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 96 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 486 जणांचाकोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 24 तर संस्थात्मक विलगीकरणात 27 रुग्ण उपचार घेत आहेत.