मारहाणप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

रत्नागिरी:-  किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.        

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  ही घटना कुवारबाव येथे २९ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी दिलीप अण्णा भिंगारे ( ५५, रा. उत्कर्षनगर, रत्नागिरी ) यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार गुरुप्रसाद विजय चव्हाण ( २८, रा. पाली, रत्नागिरी ) व मौला अब्दुल रझाक शेख ( २५, रा. कारवांचीवाडी ) या दोघांना रविवार, २१ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे .दिलीप भिंगारे हे बाजारपेठेतून कारने घरी जात होते. गाडी वळवत असताना भरधाव वेगाने आलेला ट्रक कारच्या मागे थांबला. त्याची विचारणा केली असता गुरुप्रसाद चव्हाण व मौला शेख यांनी राग ठेवून लोखंडी रॉडने मारहाण केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.