जिल्ह्यात प्रथमच 24 तासात शून्य कोरोना पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात प्रथमच 24 तासात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. या कालावधीत 716 चाचण्या करण्यात आल्या. या कालावधीत मृत्यू देखील शून्य असून 4 जणांनी कोरोनावार मात केली आहे. 

जिल्ह्यातून कोरोना हळूहळू हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. प्रथमच 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यात 24 तासात 4 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 517 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.80 टक्के आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 484 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 27 तर संस्थात्मक विलगीकरणात 17 रुग्ण उपचार घेत आहेत.