जिल्ह्यात नव्याने केवळ 8 पॉझिटिव्ह रुग्ण; 3 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 8 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गेल्या चोवीस तासात तीन रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 35 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 328 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.70 टक्के आहे. नव्याने 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 934 इतकी झाली आहे. 

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने 3 रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 475 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 79 तर संस्थात्मक विलगीकरणात 62 रुग्ण उपचार घेत आहेत.