जिल्ह्यात नवे रुग्ण केवळ 23 मात्र चार रुग्णांचा मृत्यू  

रत्नागिरी:- गुरूवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 23 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असले तरी मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 53 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 785 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.46 टक्के आहे. नव्याने 23 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 572 इतकी झाली आहे. 

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 446 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 218 तर संस्थात्मक विलीगिकरणात 119  रुग्ण उपचार घेत आहेत