जिल्ह्यात 24 तासात 43 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार 2 हजार 672 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात 43 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 2 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 102 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यत 75 हजार 436 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.19 टक्के आहे. नव्याने 43 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 424 इतकी झाली आहे. 

कोरोनावर उपचार घेत असलेल्या 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  2 मृत्यू 24 तासातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 440 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 267 तर संस्थात्मक विलगीकरणात 281 रुग्ण उपचार घेत आहेत.