जिल्ह्यात 2 हजार 77 चाचण्यांमध्ये केवळ 45 पॉझिटिव्ह रुग्ण तर 3 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार 2 हजार 77 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात 45 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 3 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 24 तासात 62 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 290 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.12 टक्के आहे. नव्याने 45 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 330 इतकी झाली आहे.

कोरोनावर उपचार घेत असलेल्या 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तीनपैकी 2 मृत्यू 24 तासातील तर 1 मृत्यू यापूर्वीचा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 436 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 307 तर संस्थात्मक विलगीकरणात 297 रुग्ण उपचार घेत आहेत.