कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर मात्र मृत्यू वाढले 

जिल्ह्यात 24 तासात 80 जण कोरोना पॉझिटिव्ह; 7 जणांच्या मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर असली तरी मृत्यूसंख्या मात्र वाढली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 80 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 43 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 74 हजार 459 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.04 टक्के आहे. नव्याने 80 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 557 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 7 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातील 6 मृत्यू यापूर्वीचे तर 1 मृत्यू 24 तासातील  आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 408 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 391 तर संस्थात्मक विलगीकरणात 269 रुग्ण उपचार घेत आहेत.