रुग्णसंख्येत घट; जिल्ह्यात 24 तासात केवळ 35 जण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात रुग्णसंख्येत उल्लेखनीय घट झाली असून गेल्या चोवीस तासांत 35 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 145 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यत 74 हजार 224 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.97 टक्के आहे. नव्याने 35 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 339 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 3 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये यापूर्वीच्या तिन्ही मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 394 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.10 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात  95 तर संस्थात्मक विलगीकरणात 355 रुग्ण उपचार घेत आहेत.