जिल्ह्यात 24 तासात 150 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 150 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 118 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 72 हजार 971 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 25 टक्के आहे. नव्याने 150 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 76 हजार 607 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 362 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.08 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 470 तर संस्थात्मक विलीकरणात 457 रुग्ण उपचार घेत आहेत.