जिल्ह्यात नव्याने 14 मृत्यूची नोंद तर 123 पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटत असले तरी कोरोनाने मृत्यूची आकडेवारी जैसे थे आहे. नव्याने 123 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 14 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 123 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 433  इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 91 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 72 हजार 76 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 55 टक्के आहे. 

नव्याने 14 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 14 पैकी 24 तासातील 2 तर त्यापूर्वीचे 12 असे 14 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 284 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.03 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 478 तर संस्थात्मक विलीकरणात 513 रुग्ण उपचार घेत आहेत.