रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र साळुंखे यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरी येथील ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र साळुंखे यांचे आज 15 जुलै रोजी सकाळी निधन झाले. कोरोना आजारातून बरे होत असतानाच त्यांना ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव झाला आणि त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरीच्या नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाटकासाठी सदैव झटणारा एक अत्यंत प्रामाणिक, सच्चा रंगकर्मी आपल्याला सोडून गेल्याची भावना आज रत्नागिरीतील नाट्यकर्मींमध्ये आहे. संकल्प कलामंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकातून उत्कृष्ट अभिनय केला. राज्य नाट्य स्पर्धेसाठी अनेक नाटकांच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता. तसेच कामगार, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्यांना नाटकांतल्या भूमिकांसाठी पारितोषिकेही मिळाली होती. नाटकांबरोबर शॉर्ट फिल्म निर्मितीमध्येही त्यांनी पदार्पण केले होते. कलेबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान होते.