जिल्ह्यात 24 तासात 298 पॉझिटिव्ह रुग्ण तर पाचजणांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 298 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 66 हजार 808 रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

नव्याने 298 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 66 हजार 808 रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 3 हजार 491 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 4 लाख 40 हजार 405 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

24 तासात 405 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 60 हजार 909 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरिणामुक्तीचे प्रमाण 91.17 टक्के आहे. 24 तासात 5 मृत्यू झाले असून मृत्यूचे प्रमाण 2. 85 टक्के आहे.