रत्नागिरी शहरातील आणखी पाच दुकानदारांवर गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कडक लॉकडाउन असतानाही आपली दुकाने उघडी ठेवून साहित्याची विक्री केली. याप्रकरणी 5 दुकान मालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मंगळवार 8 जून रोजी सकाळी 10.20 ते सायंकाळी 6 वा. कालावधीत चर्मालय, तांबट आळी, उद्यमनगर, मांडवी, तेली आळी या ठिकाणी करण्यात आली.

प्रवीण बिराजदार (29,रा. झाडगाव ) मंगेश शेट्ये (55, रा. तांबट आळी ), इरफान जांभारकर (45, रा. लांजेकरनगर ) प्रशांत पोळेकर (50, रा. मांडवी), गोविंद गजरा (37, रा. तेली आळी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुकान मालकांची नावे आहेत. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असल्याचे माहिती असूनही दुकाने  उघडून ग्राहकांना साहित्याची विक्री केली. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.