जिल्ह्यात 24 तासात 395 पॉझिटिव्ह;  13 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 395 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज रुग्णसंख्या पाचशेच्या खाली असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नव्याने सापडलेल्या 395 रुणांपैकी 272 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 123 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. जिल्ह्यात 395 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 36 हजार 439 झाली आहे. 

मागील 24 तासात 13 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या 13 मृत्यू पैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 5 मृत्यू आहेत. याशिवाय चिपळूण 3, संगमेश्वर, लांजा, खेड तालुक्यात प्रत्येकी 1 आणि राजापूर तालुक्यात 2 मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 239 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 361 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 241, खेड 124, गुहागर 86, दापोली 108, संगमेश्वर 153, लांजा 66, राजापूर 88 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.40% आहे.

जिल्ह्यात मंगळवारी 315, बुधवारी 635, गुरुवारी 437, शुक्रवारी 416, शनिवारी 494 तर रविवारी 508 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 395 नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात 802 रुग्ण आरटीपीसीआर अहवाल तर 525 रुग्ण अँटीजेन अहवाल निगेटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण 17.73% आहे तर 3417 रुग्ण उपचार घेत आहेत.