जिल्ह्यात 24 तासात 635 पॉझिटिव्ह रुग्ण तर 21 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 635 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. बुधवारी अचानक रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. नव्याने सापडलेल्या 635 रुणांपैकी 385 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 250 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 635 नव्या रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 34 हजार 189 झाली आहे. 

मागील 24 तासात 2 हजार 23 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 21 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वाढत्या मृत्यू आणि वाढलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य विभाग चिंतेत आहे. नव्याने झालेल्या 21 मृत्यू पैकी रत्नागिरी तालुक्यात 7 मृत्यू आहेत. याशिवाय लांजा 3, राजापूर 3, संगमेश्वर 2, चिपळूण 5 आणि खेड तालुक्यात एका मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 134 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 327 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 227, खेड 119, गुहागर 62, दापोली 99, संगमेश्वर 146, लांजा 62, राजापूर 80 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. 

जिल्ह्यात  बुधवारी 343, गुरुवारी 339, शुक्रवारी 450 तर शनिवारी 372, रविवारी 402, सोमवारी 393 तर मंगळवारी 315 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 635 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 385 रुग्ण आरटीपीसीआर तर 250 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 34 हजार 189 वर जाऊन पोहचली आहे.