जिल्ह्यात 24 तासात 502 पॉझिटिव्ह रुग्ण; 16 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 502 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 267 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 235 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1696 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  नवे 52 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 29 हजार 850 झाली आहे. जिल्ह्यात आज 16 मृत्यूंची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी 462, गुरुवारी 481, शुक्रवारी 512 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 502 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 267 रुग्ण आरटीपीसीआर तर 235 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 29 हजार 850 वर जाऊन पोहचली आहे. 

 मागील 24 तासात 1696 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 998 जणांपैकी 731 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 200 पैकी 965 जण निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात 16 जणाांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 905 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 3.03% एवढा मृत्यूदर आहे