जिल्ह्यात 24 तासात 481 पॉझिटिव्ह तर तब्बल 1634 जणांचा अहवाल निगेटिव्ह 

रत्नागिरी:-जिल्ह्याची कोरोना रुग्णासंख्या दोन दिवस स्थिर आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 481 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 233 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 248 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1634 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  नवे 481 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 28 हजार 836 झाली आहे. जिल्ह्यात आज 20 मृत्यूंची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी 310 तर मंगळवारी 622, बुधवारी 462 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. गुरूवारी रुग्णसंख्येत स्थिर राहीली. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 481 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 233 रुग्ण आरटीपीसीआर तर 248 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 28 हजार 836 वर जाऊन पोहचली आहे. मागील 24 तासात 1634 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात  आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 922 जणांपैकी 689 निगेटिव्ह तर 233 तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 193 पैकी 945 निगेटिव्ह तर 248 पॉझिटिव्ह आले आहेत. 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 20 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 876 इतकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.03 % आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर चिंताजनक आहे. जिल्ह्यात आज तब्बल 824 कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 23509 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 81.52% आहे.