जिल्ह्यात 24 तासात तब्बल 482 पॉझिटिव्ह रुग्ण

उपचारादरम्यान 15 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात दिड हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मागील चोवीस तासात जिल्ह्यात 482 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 482 पैकी 141 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 341 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 482 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 17 हजार 533 झाली आहे. 

मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 482 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 17 हजार 533 वर जाऊन पोहचली आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 141 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 341 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.

मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 15 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 503 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.86 % आहे. आज 254 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 12745 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 72.69 टक्के आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 482 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 134, दापोली 14, खेड 36, गुहागर 44, चिपळूण 76, संगमेश्वर 150, मंडणगड 4 आणि राजापूर तालुक्यात 24 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 12.92% आहे.